मराठी ही मातृभाषा असली तरी आमची घर-परिसरातली बोलीभाषा आणि शाळेत अभ्यासक्रमाला असलेली प्रमाण मराठी, यात फार तफावत होती. ज्यांच्या घरी प्रमाण भाषा बोलली जाते त्यांना मराठी विषय कठीण जात नाही. पण आम्ही घरी जसे बोलायचो तसे लिहिले की गुण मिळायचे नाहीत, कारण व्याकरणदृष्ट्या चुका असायच्या त्यात.
अवांतर वाचन वाढवून मग ती उणीव हळूहळू भरून काढली. तरी इंग्लिश, हिंदी, मराठी सगळं वाचत असल्यामुळं थोडी भेसळ व्हायची, अजूनही होते.
आधी शुद्ध मराठी येत नाही याचा थोडा न्यूनगंड होता; पण हळूहळू जाणवलं, की भाषा जर विचार प्रकट करण्याचे साधन असेल तर ते काम ती अचूकपणे करते की नाही हे महत्वाचे. बाकी नियम पाळण्याचा प्रयत्न करावा, पण त्याचा फार अट्टाहास नको; गाभा महत्वाचा. माझ्यापुरता प्रयत्न असा असतो की जे म्हणायचे आहे ते शक्य तितके नेमकेपणाने पोचावे; मग त्यासाठी भाषेच्या बांधणीवर जास्त लक्ष द्यावे लागले तरी चालेल; अर्थ नेमकेपणाने मांडणारे शब्द
शोधावे लागले तरी चालेल.
पण समोरच्याला काय म्हणायचंय हे जर आपल्याला बऱ्यापैकी समजत असेल, तर तांत्रिकदृष्ट्या ते किती अचूक आहे याचा खल नको. यात कधीकधी गफलत झाली; अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कुणाच्या उच्चारांवर चुकून हसणेही झाले, पण सुदैवाने कान धरणारे मैत्र असले की आरसा दाखवला जातो, आणि अशा चुका होऊ नयेत यासाठी मग आपण सजग राहतो.
लिखित भाषेबद्दल मात्र माझा संभ्रम कायम आहे. कुठल्याही संपर्कव्यवस्थेत काही मूलभूत सार्वत्रिक नियम असतात, ज्यामुळे गोंधळ न होता संपर्क सुलभ होतो. जर कुठलेच नियम मानायचे नाही असे म्हटले तर साधन म्हणून भाषेची(लिपीची) परिणामकारकता कमी होणार नाही का? लिपी असलेल्या प्रत्येक भाषेचे वाक्यरचनेचे, व्याकरणाचे काही नियम असतात. त्या नियमांना अनुसरून ती भाषा शिकली शिकवली जाते. जर हे नियम पाळले गेले नाहीत तर आकलनात बाधा येणार नाही का?
कुठलेही सार्वजनिक माध्यम वापरून जेव्हा कुणी व्यक्त होतो, तेव्हा वाचक हवे असतात हे निर्विवाद. अनुनय किंवा वाचकशरणता म्हणून नव्हे, पण जे स्वतःला वाटतंय ते कुणापर्यंत तरी पोहोचवणे ही निकड असते म्हणून जर लिहितो, तर ते लिखाण वाचणाऱ्यांपैकी बहुतांश जणांपर्यंत तरी नीट पोहोचावे म्हणून काही एक चौकट आखावी लागेल ना?
ग्रामीण भाषा, विभागीय भाषा वापरताना कधीकधी तिला कसलेच नियम लागू होत नाहीत अशा प्रकारे लिहिले जाते, पण त्या भाषांमध्येही एक सुसूत्रता, एक आकृतिबंध असतो; तो सांभाळला गेला पाहिजे की नको?
अजून एक मुद्दा येतो तो परभाषेतील शब्दांचा. कालौघात काही मराठी शब्द लुप्त झाले असणार, काही परकीय भाषेतील शब्दांची भर पडली असणार. यातही सीमाभागात शेजारच्या राज्याच्या भाषेतील शब्द रुजण्याचे प्रमाण जास्त असते. किंवा जिथे मुस्लिम राज्यकर्त्यांचे शासन होते, तिथे उर्दू फारसी शब्द जास्त आले. आता इंग्रजी शब्दांची आयात जास्त आहे. हे सगळे शब्द परके मानायचे की मिसळू द्यायचे?
मुळात भाषाच काय, कुठलीही गोष्ट उपयुक्त आणि प्रासंगिक असेल तर ती काळाच्या कसोटीवर टिकून राहते...
मराठीवर प्रेम असेल तर ती ज्ञानभाषा आणि संवादाचे प्रमुख माध्यम होईल आणि राहील, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
हे करताना तिचा धाक कमी आणि प्रेम अधिक वाटले, तर तिच्या बहरण्याची शक्यता जास्त आहे...
#मराठी_भाषा_दिन
अवांतर वाचन वाढवून मग ती उणीव हळूहळू भरून काढली. तरी इंग्लिश, हिंदी, मराठी सगळं वाचत असल्यामुळं थोडी भेसळ व्हायची, अजूनही होते.
आधी शुद्ध मराठी येत नाही याचा थोडा न्यूनगंड होता; पण हळूहळू जाणवलं, की भाषा जर विचार प्रकट करण्याचे साधन असेल तर ते काम ती अचूकपणे करते की नाही हे महत्वाचे. बाकी नियम पाळण्याचा प्रयत्न करावा, पण त्याचा फार अट्टाहास नको; गाभा महत्वाचा. माझ्यापुरता प्रयत्न असा असतो की जे म्हणायचे आहे ते शक्य तितके नेमकेपणाने पोचावे; मग त्यासाठी भाषेच्या बांधणीवर जास्त लक्ष द्यावे लागले तरी चालेल; अर्थ नेमकेपणाने मांडणारे शब्द
शोधावे लागले तरी चालेल.
पण समोरच्याला काय म्हणायचंय हे जर आपल्याला बऱ्यापैकी समजत असेल, तर तांत्रिकदृष्ट्या ते किती अचूक आहे याचा खल नको. यात कधीकधी गफलत झाली; अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कुणाच्या उच्चारांवर चुकून हसणेही झाले, पण सुदैवाने कान धरणारे मैत्र असले की आरसा दाखवला जातो, आणि अशा चुका होऊ नयेत यासाठी मग आपण सजग राहतो.
लिखित भाषेबद्दल मात्र माझा संभ्रम कायम आहे. कुठल्याही संपर्कव्यवस्थेत काही मूलभूत सार्वत्रिक नियम असतात, ज्यामुळे गोंधळ न होता संपर्क सुलभ होतो. जर कुठलेच नियम मानायचे नाही असे म्हटले तर साधन म्हणून भाषेची(लिपीची) परिणामकारकता कमी होणार नाही का? लिपी असलेल्या प्रत्येक भाषेचे वाक्यरचनेचे, व्याकरणाचे काही नियम असतात. त्या नियमांना अनुसरून ती भाषा शिकली शिकवली जाते. जर हे नियम पाळले गेले नाहीत तर आकलनात बाधा येणार नाही का?
कुठलेही सार्वजनिक माध्यम वापरून जेव्हा कुणी व्यक्त होतो, तेव्हा वाचक हवे असतात हे निर्विवाद. अनुनय किंवा वाचकशरणता म्हणून नव्हे, पण जे स्वतःला वाटतंय ते कुणापर्यंत तरी पोहोचवणे ही निकड असते म्हणून जर लिहितो, तर ते लिखाण वाचणाऱ्यांपैकी बहुतांश जणांपर्यंत तरी नीट पोहोचावे म्हणून काही एक चौकट आखावी लागेल ना?
ग्रामीण भाषा, विभागीय भाषा वापरताना कधीकधी तिला कसलेच नियम लागू होत नाहीत अशा प्रकारे लिहिले जाते, पण त्या भाषांमध्येही एक सुसूत्रता, एक आकृतिबंध असतो; तो सांभाळला गेला पाहिजे की नको?
अजून एक मुद्दा येतो तो परभाषेतील शब्दांचा. कालौघात काही मराठी शब्द लुप्त झाले असणार, काही परकीय भाषेतील शब्दांची भर पडली असणार. यातही सीमाभागात शेजारच्या राज्याच्या भाषेतील शब्द रुजण्याचे प्रमाण जास्त असते. किंवा जिथे मुस्लिम राज्यकर्त्यांचे शासन होते, तिथे उर्दू फारसी शब्द जास्त आले. आता इंग्रजी शब्दांची आयात जास्त आहे. हे सगळे शब्द परके मानायचे की मिसळू द्यायचे?
मुळात भाषाच काय, कुठलीही गोष्ट उपयुक्त आणि प्रासंगिक असेल तर ती काळाच्या कसोटीवर टिकून राहते...
मराठीवर प्रेम असेल तर ती ज्ञानभाषा आणि संवादाचे प्रमुख माध्यम होईल आणि राहील, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
हे करताना तिचा धाक कमी आणि प्रेम अधिक वाटले, तर तिच्या बहरण्याची शक्यता जास्त आहे...
#मराठी_भाषा_दिन
No comments:
Post a Comment