आवडत्या व्यक्तीची भेट झाली की वेळ फास्ट फॉरवर्ड होऊन पळायला लागतो.
कधी व्यवधाने सांभाळत, कधी चोरून ठरलेली भेट आणि या चोरलेल्या तुटपुंज्या क्षणांत किती मोठी बेगमी करण्याची धडपड...त्यात कधी तिला निघण्याची घाई तर कधी त्याला. या प्रसंगावर खूप सुरेख गाणी आहेत; इतकी हृद्य सिच्युएशन गीतकरांना इंस्पायर न करती तरंच नवल!
क्षणिक भेटीबद्दल कातर होता होता बऱ्याचदा क्षणभंगुर आयुष्यावर भाष्य करून जातात ही गाणी, आणि हाती असलेले मोजके क्षण भरभरून जगण्याची सादही घालतात...
अनारकली चित्रपटातील गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या 'ये जिंदगी उसी की है' मधलं हे कडवं..
"धड़क रहा है दिल तो क्या,
दिल की धड़कनें ना सुन
फिर कहां ये फ़ुर्सतें,
फिर कहाँ ये रात-दिन
आ रही है ये सदा,
मस्तियों में झूम जा..."
'आज जाने की जिद ना करो' या गजलमध्ये शायर फय्याद हाश्मी यांनीही हीच भावना मांडलीय...
"कितना मासूम रंगीन है ये समा
हुस्न और इश्क़ की आज मैराज है
कल की किसको खबर जान-ए-जाँ
रोक लो आज की रात को"
गुलजार साहेब आँधी मधल्या सुप्रसिद्ध गाण्यातही हेच म्हणतात...
" तुम जो कह दो तो
आजकी रात चांद डूबेगा नहीं,
रात को रोक लो
रात कि बात है, और ज़िंदगी बाकी तो नहीं"
ही भावनाच इतकी युनिव्हर्सल आहे की मराठीतही खेबुडकरांनी असंच काहीसं म्हटलंय,
"चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना"
तेच पुन्हा 'पिंजरा'तल्या लावणीत म्हणतात,
" अशीच ऱ्हावी रात साजणा कधी न व्हावी सकाळ..."
गंमत म्हणजे आंग्लभाषेतही बिली जोएलने
हा भाव त्याच्या एका गाण्यात शब्दबद्ध केलाय,
"I'll tell you to forget yesterday
This night we are together
This night is mine
It's only you and I
Tomorrow is a long time away
This night can last forever..."
No comments:
Post a Comment